fifth-industrial-revolution-roi-ai : पाचव्या औद्योगिक क्रांतीत कमी खर्चात अधिक परतावा मिळविणे महत्त्वाचे असून एआय-आधारित उपायांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दावोस येथे सांगितले.


दावोस : पाचव्या औद्योगिक क्रांतीचे अर्थशास्त्र हे गुंतवणुकीवरील परतावा (ROI) यावर आधारित असेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितले. त्यांनी भारताच्या एआय-आधारित सेवा क्षेत्रातील क्षमतेवर भाष्य करताना हे मत व्यक्त केले.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, या पाचव्या औद्योगिक क्रांतीमधील अर्थकारण हे कमी खर्चात अधिकाधिक परतावा मिळविण्यावर आधारित असेल. जर एखाद्याकडे ५० अब्ज पॅरामिटर असलेले मॉडेल असेल, तर ते एका जीपीयूवर सहजपणे तैनात करता येते. तसेच, ३० अब्ज पॅरामिटरचे मॉडेल हे सुमारे 80 टक्के कामासाठी पूर्णपणे उपयुक्त ठरते आणि अशा मॉडेलसाठी जीपीयूचीही आवश्यकता नसते.
We need to understand the economics of this emerging Fifth Industrial Revolution. The economics of this fifth Industrial Revolution is going to come from ROI
ROI is going to come from deploying the lowest-cost solution to get the highest possible return. If you have a… pic.twitter.com/Ltdikyx4mC
— PIB India (@PIB_India) January 21, 2026
भारत एआय-आधारित उपाययोजनांमध्ये सेवा क्षेत्रासाठी सक्षम असून, कमी खर्चात प्रभावी उपाय उपलब्ध करून देण्याची क्षमता भारताकडे आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी स्पष्ट केले.


