mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल; ९, २३ व २९ एप्रिलला मतदान, ४ मे रोजी निकाल| Five States Assembly Elections

शेअर करा :

Five States Assembly Elections : निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. ९, २३ व २९ एप्रिलला मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Five States Assembly Elections
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने रविवारी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. या निवडणुकांमध्ये १७.४ कोटी मतदार आणि एकूण ८२४ विधानसभा जागा आहेत. सर्व राज्यांतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

👉 देशातील ताज्या राजकीय बातम्यांसाठी वाचा : राजकारण

निवडणूक कार्यक्रमानुसार तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक नवीन उपक्रम राबवले आहेत. मतदार यादीतील अपात्र व्यक्तींचा समावेश टाळण्यासाठी तसेच मतदान केंद्रांवरील शिस्त राखण्यासाठी काही सुधारित उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Five States Assembly Elections

 

मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग

मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि देखरेख वाढवण्यासाठी या निवडणुकांदरम्यान चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.

Five States Assembly Elections

 

आचारसंहिता तात्काळ लागू

निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच सर्व पाच राज्यांमध्ये आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. त्यामुळे आता कोणत्याही राज्य सरकारला नवीन योजना किंवा घोषणा करण्यास परवानगी राहणार नाही.

👉 महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र

हिंसाचार सहन केला जाणार नाही

मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२६ नुसार पात्र नागरिकांना मतदार यादीत समाविष्ट करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, २०२१ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत, आसाममध्ये तीन टप्प्यांत, तर तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. या पाचही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येणार असल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको